या पुस्तकाविषयी
हे अशा प्रकारचं पहिलं पुस्तकं आहे. ही शिक्षकाची तसंच उच्ब शिक्षणाचीही कथा आहे. विद्यापीठ ही ज्ञान आणि धोक्याची एक व्यामिश्र जागा आहे. विद्यापीठ शिकवत, नियंत्रित करतं, आणि हेराफेरीही करतं. डॉ. लक्ष्मण यादव यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षकच ही व्यामिश्र कथा सांगू शकत होता.' - कांचा इलैया 'प्रामाणिकपणे लिहिल्यास प्रत्येक डायरी आपल्या खासगी गोष्टीबरोबरच आपल्या काळाचा एक दस्तावेजही असते. डॉ. लक्ष्मण यांना रघुवीर सहाय यांच्या रामदासप्रमाणे जाणीव होती, की त्यांची हत्या होईल आणि ती होते. ही डायरी त्या सत्याला नागडं करते, जे आपल्याला माहीत आहे, पण ते मान्य करत नाही. हे पुस्तक आपल्या शिक्षण व्यवस्थेची गटारगंगा उघडी पाडतं. हे पुस्तक म्हणजे मंडल ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत कॅम्पसचा इतिहास आहे.' - डॉ. विजेंद्र चौहान 'एक भयभीत शिक्षक आपल्या वर्गात कणाहीन विद्यार्थी घडवतो, जो विद्यार्थी समाजात जाऊन मुडदा नागरिकामध्ये रूपांतरित होतो.'
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.