पुस्तक प्रकाशन सोहळा – अनुप कुमार यांचे दोन कवितासंग्रह
कवी : श्री अनुप कुमार, भाप्रसे
पद : अतिरिक्त मुख्य सचिव (सहकार व पणन)
श्री अनुप कुमार यांच्या दोन कवितासंग्रहांचा लोकार्पण व प्रकाशन सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात त्यांच्या हिंदी कवितासंग्रहाचे —
‘इसलिए बची हुई है पृथ्वी अब तक’
याचे लोकार्पण
तसेच मराठी कवितासंग्रहाचे —‘जग नावाचं छोटंसं गाव’याचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे तपशील
दिनांक : १ जून २०२४
वेळ : सायंकाळी ५.३० ते ८.०० वा.
स्थळ : ऑपेरा हाऊस सभागृह, चर्नी रोड (पूर्व), गिरगाव, मुंबई
या विशेष साहित्यिक सोहळ्यात अनुप कुमार यांच्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील काव्यलेखनाचा परिचय वाचकांसमोर आला. दोन वेगवेगळ्या भाषांमधून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या संवेदना, सामाजिक जाणिवा आणि जीवनानुभवांचा वेध घेणारे हे दोन्ही कवितासंग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित झाले.
कविता कधी 'शून्य'मध्ये लिहिली जात नाही. कविता आपल्या सभोवतीच्या समाजासोबत संवाद असते. कोणतेही साहित्यिक माध्यम असो- कविता, कथा, कादंबरी, नाटक किंवा निबंध, त्याचे लेखन एका ठोस सामाजिक सांस्कृतिक परिवेशामध्येच होते. मराठी भावभूमी आणि इथल्या माणसांवर लिहिलेल्या हिंदी कवितांचे भाषांतर करून त्यांचा समावेश या संग्रहामध्ये करण्यात आलेला आहे. या कवितांचे भाषांतर डॉ. शिवदत्त वालावलकर यांनी केलेले आहे. डॉ. वालावलकर हे एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे परिसरात हिंदीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. वालावलकर यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली येथून हिंदी साहित्यामध्ये पीएचडी व पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केलेले आहे. या हिंदी कवितांचे मर्म समजून त्यांना सहज मराठीमध्ये भाषांतरीत करण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम त्यांनी कमी कालावधीत पूर्ण केलेले आहे. त्यांचे ह्रदयापासून आभार ! या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी कवी श्री. श्रीकांत देशमुख यांच्याकडून संपादन सहयोग प्राप्त झालेला आहे. शब्दालय प्रकाशनच्या प्रमुख मराठीतील ज्येष्ठ कवयित्री श्रीमती सुमती लांडे यांनी मौल्यवान मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्यामुळे या कवितांचे परिमार्जन करून पाठकासाठी उपलब्ध करणे शक्य झाले आहे.
Anup Kumar’s ‘Jag Navach Chotasa Gaav’ and ‘Isliye Bachi Hui Hai Prithvi Ab Tak’ Launched in Mumbai
A special book launch and literary release ceremony for two poetry collections by Anup Kumar, IAS, Additional Chief Secretary (Cooperation & Marketing), was held in Mumbai on 1 June 2024.
The event featured the launch of his Hindi poetry collection ‘Isliye Bachi Hui Hai Prithvi Ab Tak’ along with the publication of the Marathi poetry collection ‘Jag Navach Chotasa Gaav’. Through these two books, readers were introduced to Anup Kumar’s poetry in both Hindi and Marathi, reflecting his social awareness, personal experiences and engagement with contemporary life.
The literary programme was held from 5:30 PM to 8:00 PM at Opera House Hall, Charni Road (East), Girgaon, Mumbai.