About This Book
१४ कथांच्या या संग्रहात विषयांचं भरपूर वैविध्य आहे. ग्रामीण बाज आहे, दुःख आहे, वेदना आहे, मैत्री आहे, तीही दोन विभिन्न धर्मातल्या दोन पुरुषांमधली तसंच एका संस्थानिक घराण्यातली मुलगी आणि सामान्य घरातल्या मुलामधली, शाळकरी मुलांमधली, मैत्रीची ही वेगवेगळी रूपं मोहित करणारी आहेत. शिक्षणाची आस असलेल्या एका आईनं आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आहेत. यातल्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या कथांमधले तपशील अगदी अस्सल आहेत, तसंच मुंबईच्या चाळीतल्या जगण्याचे सुद्धा. ते ते वातावरण उभं करण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो. तीच गोष्ट संवादाची, शाळकरी वयातले मित्रांमधले संवाद असोत वा ग्रामीण भागातले नवरा बायकोचे, बाप लेकातले असोत, ती पात्रं आपल्या समोरच बोलताहेत असं वाटतं.।
नीलिमा बोरवणकर
Book Images
About the Author
Dr. (Naru) Bhau Kadam | डॉ. (नरु) भाऊ कदम
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review