About this book
या पुस्तकाविषयी
भारतीय इतिहासात ब्रिटीश आमदनीत जी विविध संस्थाने होती, त्यात कोल्हापूर, बडोदे आणि इंदूर ही संस्थाने वैशिष्ट्यपूर्ण होती. लोककल्याणकारी राज्यकारभार आणि प्रगतीशील विचारधारा हे त्यांचे मुख्य सूत्र होते.
इंदूरच्या होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर. हिंदुस्थानभर मराठा सत्तेचा अंमल प्रस्थापित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मल्हारराव हे मराठेशाहीचा आधारस्तंभ होते. अहिल्याबाईंनी तीस वर्षे शांततापूर्ण राज्यकारभार करून होळकरशाहीचा पाया आणखी मजबूत केला आदर्श राज्यकारभार आणि सात्त्विक, समर्पित जीवन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते. यशवंतराव होळकर यांनी अडचणीच्या प्रसंगांतून होळकरशाहीचे राज्य वाचविले. ते धडाडीचे योद्धे आणि स्वातंत्र्यवीर होते.
होळकरशाहीतील ही तीन प्रमुख राज्यकर्ती व्यक्तिमत्त्वे. त्यांच्या चरित्र आणि कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या काव्याचा हा संकुलनात्मक ग्रंथ आहे. कविता, गीत, पोवाडा, पाळणा, दीर्घकाव्य, पद्यमय चरित्र अशा विविध काव्यप्रकारांतून या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वांचे काव्यरूपातून परिशीलन करणारा हा ग्रंथ इतिहासप्रेमी आणि वाड्मयप्रेमी रसिकांना निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे वाटते.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं