About this book
सट्टक मधील 'सरवा', 'अस्तुरीमृग' आणि 'मृत्यू' या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कबी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडबा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा हा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा 'सरवा' बेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती 'अस्तुरीमृग' मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे बाचकाला सुन्न करून सोडतात. 'अस्तुरीमृग' मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर 'मृत्यू' या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते.
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.